बहुजननामा ऑनलाईन : लडाखमध्ये भारत आणि चीनमधील वाद सतत वाढत चालला आहे. चीनने सोमवारी रात्री एलएसीवर भारतीय लष्कराने फायरिंग केल्याचा आरोप केला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही स्तरावर भारतीय लष्कराने एलएसी ओलांडली नाही किंवा फायरिंगसह कोणत्याही आक्रमकतेचा वापर करण्यात आला नाही. चीनी लष्कर पीपल्स लिब्रेशन आर्मीच कराराचे उल्लंघन करत आक्रमक युद्धाथ्यास करत आहे. चीनी मीडियामध्ये भारत-चीनमधील सुरू असलेल्या वादावर आर्टिकल प्रसिद्ध होत आहेत.
चीनी मीडियाचा प्रोपगंडा
चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स आपल्या सरकारचा प्रोपगंडा पसरवत आहे. वृत्तपत्राने पीएलएच्या वेस्टर्न कमांडच्या प्रवक्त्याच्या संदर्भाने लिहिले आहे की, भारतीय लष्कराने सोमवारी पँगोंग सरोवराच्या दक्षिण किनार्यावर शेनपाओ पर्वत परिसरात एलएसी अवैध पद्धतीने पार केली आणि त्यानंतर गस्त घालत असलेल्या चीनी सैनिकांसमोर हवेत फायरिंग केली. चीनी सीमेवर गस्त घालत असलेल्या दलासमोर स्थिरता कायम करण्यासाठी नाईलाजाने काऊंटर अटॅक करावा लागेल.
इतिहासाची होईल पुनरावृत्ती
ग्लोबल टाइम्सने मंगळवारी एक आर्टिकल छापले आहे. या लेखाचे शीर्षक आहे – जर भारताने सीमेवर पुन्हा चुक केली तर इतिहासाची पुरावृत्ती होईल. ग्लोबल टाइम्सने बनावट दावा करत लिहिले आहे की, भारताने सीमेवर शस्त्र न वापरण्याचा करार मोडला आहे. भारतीय बाजूला वाटते की, शस्त्रांचा वापर न केल्यामुळे त्यांची स्थिती कमजोर आहे. यासाठी भारतीय लष्कर आपली क्षमता मजबूत करण्यासाठी शस्त्रांचा वापर करत आहे.
मोदी सरकारने दिला फ्री हँड
चीनी मीडियाने आक्षेत नोंदवला की, जूनमध्ये गलवान खोर्यात भारत-चीनच्या दरम्यान झालेल्या संघर्षानंतर भारताने आपल्या आर्मीला एलएसीवर फ्री हँड दिला आहे. वृत्तपत्राने लिहिले, या पावलाचा अर्थ आहे की, आता ते शस्त्राचा वापर न करण्याबाबत बांधिल नाहीत. तणावपूर्ण स्थितीत भारताचे हे पाऊल बेजबाबदार आहे.
सीमेवर स्थिती होईल खराब
ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, आता भारतीय लष्कराने वॉर्निंग शॉट फायर केले आहे तर दोन्ही पक्षात समस्या सोडवण्यावर एकमत होण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. चीनी आणि भारतीय लष्करात झटापट दंडक्यांनी होत होती, आता बंदूकांच्या वापराने सीमेवरील स्थिती आणखी खराब होईल. भारत सीमेवर एकतर्फी उल्लंघन करत आहे.
गंभीर होतील परिणाम
या लेखात म्हटले आहे की, जर भारतीय लष्कराने बंदूकांचा वापर केला तर चीनी लष्कराचा सुद्धा असे करण्यासाठी नाईलाज असेल. भारतीय मीडियात म्हटले जात आहे की, त्यांच्या सैनिकांनी पँगोंग सरोवराच्या दक्षिण किनार्यावर दोन कमांडिंग हाईट्सवर कब्जा केला आहे. चीनी क्षेत्रात अशाप्रकारच्या भडकावण्याच्या पावलांचे गंभीर परिणाम होतील आणि त्यास कोणत्याही स्थितीत उत्तर दिले जाईल.
भारतीय लष्कराला घ्यायचाय बदला
ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे, 1962मध्ये भारत-चीन युद्धात भारताचा दारूण पराभव झाला होता. भारतीय सैनिकांना याचा बदला घ्यायचा आहे. भारताने पर्वतांवर आपली क्षमता मजबूत केली आहे. अमेरिकेकडून शस्त्र खरेदी केली आहेत.
अमेरिका विकणार शस्त्र
चीनी वृत्तपत्राने म्हटले आहे, अमेरिका भारताचा मोठा समर्थक आहे. जर भारत आणि चीनमध्ये युद्धा झाले तर अमेरिका हे पाहून आनंदी होईल. तो भारताला अपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करेल. शिवाय भारतासाठी अमेरिका अंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करेल. तो चीनविरूद्ध जमवाजमव वाढवेल. अमेरिकेला सैनिक आणि राजकीय आघाडीची संधी मिळेल. अमेरिकेला सर्वात आनंद या गोष्टीचा होईल की, तो मोठ्या फायद्यात विविध प्रकारची आधुनिक शस्त्र विकू शकेल. अमेरिका भारताला मिलिट्री इंटेलिजन्ससुद्धा पुरवू शकतो.
भारताला दाखवून दिली दुर्बलता
चीनी मीडियाने भारतीय लष्कराच्या दुर्बलतेवर सुद्धा भाष्य केले आहे. भारत बहुतांश शस्त्र, लष्करी उपकरणे आयात करतो. तर चीनची पीएलए लष्करी संघर्षात झालेल्या नुकसानीची ताबडतोब भरपाई करू शकते. कारण चीनच्या इंडस्ट्रीत उत्पादन करण्याची क्षमता आहे. कृषि आणि उद्योगात 50-50 मॉडलवर अवलंबून असणार्या भारताला कोणत्याही नुकसानीतून पुन्हा उभे राहाणे अवघड होणार आहे. भारताने नाजूक स्थितीत इतर देशांकडून शस्त्र खरेदी केली तर त्यास मोठी किंमत चुकवावी लागेल. यासाठी वाटसुद्धा पहावी लागेल, यामुळे त्याच्या लढण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल.
चीनी मीडियाचा दावा
चीनी वृत्तपत्राने लिहिले आहे, पीएलएसाठी भारताला हरवणे ही कोणतीही समस्या नाही, तर सीमेवर शांतता प्रस्तापित करणे एक आव्हान आहे. दोन्ही देश शांघाय सहकार्य काराचे सदस्य आहेत आणि दोघांनी शांततेसाठी, वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण जर भारताने पुन्हा चीनला भडकावण्याचा प्रयत्न केला तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. भारतीय लष्कराचा पराभव निश्चित होईल.