नवी दिल्ली : वृत्त संस्था – अनेकदा सोशल नेटवर्किंग साईटमुळे अनेक मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. नुकताच फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉटसअॅपच्या प्रायव्हसीबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून जगभरातील देशांमध्ये करण्यात येत असलेल्या हेरगिरीची चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांकडून खळबळजनक माहिती समोर आली आहे. हँकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांवर नजर ठेवली जात होती. युजर्सचा फोन हॅक करण्यासाठी Facebook Inc’s WhatsApp याचा वापर करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकार्यांनी दिली आहे.
दरम्यान, मंगळवारी, फेसबुककडून इस्त्रायलची सायबर सुरक्षा कंपनी एनएसओवर हँकिंगचा आरोप करत याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अनेक मोठमोठ्या देशांचे वरिष्ठ अधिकारी या हॅकर्सच्या निशाण्यावर होते. यामध्ये अमेरिकेसोबत करार असलेल्या तसेच संघटनेत सहकारी असलेल्या देशांचाही समावेश आहे. यामध्ये अमेरिका, युएई, बहरीन, मेक्सिको, पाकिस्तान, भारत या देशांतील लोकांचा समावेश आहे.
देशातही हेरगिरी होत असल्याचं समोर येताच विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकार देशातील पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत ठेवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. त्यानंतर माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तत्कालिन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि जनरल वीके सिंह यांच्यासोबत २०११ आणि २०१३ मध्ये हेरगिरीचे प्रकार घडल्याचेही स्पष्ट केले. याचे उत्तर त्यांनी व्हॉटसअॅपकडे मागितलं असून याचे उत्तर देण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला असल्याचंही रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.
दरम्यान एनएसओ कंपनीवर व्हॉटसअॅपसर्व्हरचा वापर केल्याचा आऱोप आहे. त्याच्या माध्यमातून २९ एप्रिल २०१९ ते १० मे २०१९ या कालावधीत १ हजार ४०० युजर्सच्या मोबइल फोनवर मालवेअर अटॅक करण्यात आला. यामध्ये २० देशांमधील पत्रकार, सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते यांचा समावेश आहे.भारतातील मानवाधिकार कार्यकर्ता आणि वकील शालिनी गेरा यांनीही आपलं व्हॉटसअॅप हॅक केल्याचं म्हटलं आहे.
सध्या तरी कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला, हे स्पष्ट झालेलं नाही. परंतु हॅक करण्यात आलेल्या व्हॉटसअॅपपच्या युजर्सची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत एनएसओने स्पष्टीकरण देत सांगितलं की, कंपनी त्यांचे स्पायवेअर सरकारी कंपन्यांना विकते. मात्र त्याचा वापर अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते किंवा पत्रकार यांच्याविरुद्ध करत नाही. तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी करण्याची परवानगी दिली जाते.
Visit : Bahujannama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –