नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सतत महत्वाची पावले उचलत आहे. कृषी मंत्रालयाने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत.
या संदर्भात, जर्मनीने भारतीय तंत्रज्ञान व व्यवस्थापन तज्ञांना भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करण्याची ऑफर दिली आहे. १ नोव्हेंबरला जर्मन अन्न व कृषी मंत्री ज्युलिया क्लॉकनर यांनी भारताचे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यासमवेत बैठक घेतली. ज्युलिया क्लॅकनर यांनी सांगितल्याप्रमाणे, जर्मनीत यांत्रिकीकरण व कापणीनंतरचे व्यवस्थापनाचे कौशल्य आहे, जे भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी कृषी बाजार विकास सहकार्याशी संबंधित संयुक्त घोषणेवरही स्वाक्षरी केली. बैठकीत नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, भारताने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, ‘उत्पादन वाढविण्यावर तसेच खर्च कमी करण्यासाठी, स्पर्धात्मक बाजारपेठ आणि शेतीमालाला मूल्यवर्धित बळकटी देण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
तोमर पुढे म्हणाले कि, कृषी निर्यात धोरण २०१८ अंतर्गत भारताने २०२२ पर्यंत आपल्या कृषी उत्पादनांची निर्यात २० अब्ज डॉलर्सपर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दोन्ही मंत्र्यांनी सांगितले की, कृषी हे दोन्ही देशांचे प्राथमिक क्षेत्र आहे. यांत्रिकीकरण, कापणीनंतरचे व्यवस्थापन, पुरवठा साखळी, बाजारपेठ प्रवेश, निर्यात, अन्न सुरक्षा, प्रयोगशाळा उभारण्यास सहकार्य, खाद्य तपासणी कार्यशाळा इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
Visit : Policenama.com
- भात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क ! बिनधास्त करा सेवन
- क्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली ? जाणून घेवूयात रहस्य
- वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या
- ‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय
- भातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
- मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट
- सावधान ! जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे
- गर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता
- ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ हवेत का ? मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा
- पौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस !