नवी दिल्ली : जम्मू – काश्मीर चे कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरले आहे. पाकिस्तान एकटा ह्या निर्णयाला विरोध करत आहे. ह्या निर्णयानंतर इम्रान खान ची तळमळ सुरु आहे. दरम्यान , प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काश्मीर हा भारताचा आपापसातील मुद्दा आहे , त्यामुळे पाकिस्तान ने यामध्ये पडण्याचे काही कारण नाही. असे स्पष्ट केले आहे.
भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव वाढला आहे. यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जर युद्ध झालेच तर , भारत प्रत्येक स्तरावर पाकिस्तान ला चोख उत्तर देऊ शकतो. एका रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार , भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त प्रमाणात युद्ध सामग्री उपलब्ब्ध आहे.
हि आहे भारताची ताकद :
– सैन्य खर्चाबाबत सांगायचे झाल्यास भारताने गेल्या वर्षी ६६. ५१ करोड डॉलर ची गुंतवणूक केली आहे. भारत जगाच्या पाठीवर चौथ्या क्रमांकाचा बलाढ्य देश आहे, याउलट पाकिस्तान ने ११. ३७ करोड रुपये खर्च केले आहेत.
– भारताकडे हवाई दलात एकूण २०८२ विमान असून पाकिस्तान जवळ १३४२ विमान संख्या आहे. भारत इथेही ४ थ्या क्रमांकावर असून पाकिस्तान ७ व्या क्रमांकावर आहे.
– भारताजवळ ३० लाखा पेक्षा सैन्य आहे तर पाकिस्तान कडे ९. ३६ लाख सैन्य आहे.
– भारताजवळ एकूण ४१८४ टॅंक तर पाकिस्तान जवळ २२०० टॅंक आहेत . यामध्ये ही भारत ६ व्या क्रमांकावर आहे.
– सागरी सैन्य दलात भारताजवळ २९५ जहाज आहेत तर , पाकिस्तान जवळ १९७ जहाज आहेत. तर एकूण १६ सबमरीन भारताजवळ आहेत तर पाकिस्तान जवळ ५ सबमरीन आहेत.
– फक्त एका गोष्टीत पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे, पाकिस्तान कडे १४० परमाणू हत्यारे तर भारताकडे ११० परमाणू हत्यारे आहेत.