बहुजननामा ऑनलाइन : जम्मू – काश्मीर च्या कलम ३७० हटविल्यानंतर एकमेव पाकिस्तानने याला विरोध केला आहे. यासाठी पाकिस्तान ने अनेक राष्ट्रांची मदत मागितली. संयुक राष्ट्रांच्या बैठकीतही पाकिस्तान ने हा विषय मांडला . पण कोणीही यात पाकिस्तानचे समर्थन केले नाही. त्यात आता पाकिस्तान ला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) चे अध्यक्ष पोलंड देशाने देखील फटकारले आहे. पोलंड ने स्पष्ट केले कि, नवी दिल्ली आणि इस्लामाबाद ने काश्मीर मुद्द्याला द्विपक्षीय स्तरावर सोडवायला हवे.
भारत आणि पाकिस्तान मधील वादग्रस्त संबंधावर पोलंड ने पहिल्यांदा भाष्य केले. दरम्यान , यूएनएससी ने काश्मीर मुद्दा उठवणाऱ्या पाकिस्तान च्या आशेवर पाणी फेकले आहे. पोलंड च्या प्रतिक्रिये आधी रशिया ने देखील या मुद्यावर भारताचे समर्थन केले होते. रशिया ने सांगितले कि , जम्मू- काश्मीर ला विभाजित करण्याचा घेतलेला मुद्दा संविधानाच्या आधारेच घेतला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान चा या विषयावर होणारा वाद थांबण्याचे आम्ही आश्वासन देतो.
भारत आणि पाकिस्तान मधील वाढता तणाव पाहता , पोलंड चे राजदूत बुराकोव्सकी म्हणाले , कोणत्याही वादाचे उत्तर हे शांततेने देखील मिळू शकते, युरोपीय युनिअन च्या प्रमाणे पोलंड देखील, भारत पाकिस्तान चा हा वाद शांततेने सोडवू इच्छितो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद चे सदस्य म्हणून सुरक्षिततेसाठी पोलंड नेहमी तयार आहे. आम्ही ‘द्विपक्षीय ‘या शब्दावर जोर देत आहोत , कारण तो अत्यंत महत्वाचा आहे. पोलंड ने केलेलं हे वक्त्यव्य भारताच्या बाजूने आहे. कारण भारत नेहमी सांगत असतो कि , ‘लाहोर घोषणा पत्र, 1999’ आणि ‘ शिमला ,१९७२’ संदर्भातील काश्मीर मुद्द्यावर भारत – पाकिस्तान नेहमी द्विपक्षीय स्तरावर सोडवू इच्छितो. पाकिस्तान नेहमी काश्मीर मुद्द्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतो. मिळालेल्या माहितीनुसार , परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पोलंड चे परराष्ट्रमंत्री यांच्या मध्ये झालेल्या बोलणी वरून , जम्मू – काश्मीर चा हा मुद्दा भारताचा आपापसातील मुद्दा आहे. ज्याचे उद्धिष्ठ दहशतवादी क्षेत्रात सुरक्षा प्रस्थापित करणे आहे.