चेन्नई : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चेन्नईत मोठा विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडचा 317 धावांनी पराभव करत विजय मिळवला. याच मैदानावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत 227 धावांनी विजय मिळवला होता. आता त्याच मैदानावर भारताने त्यांच्यापेक्षा मोठा विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
2nd Test. It’s all over! India won by 317 runs https://t.co/Hr7Zk2BVcc #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) February 16, 2021
इंग्लंड समोर 429 धावांचे लक्ष्य होते. तर भारताला विजयासाठी केवळ 7 विकेटची गरज होती. इंग्लंडचा दुसरा डाव 164 धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाच्या या विजयाचा खरा हिरो ठरला तो आर अश्विन. अश्विनने पहिल्या डावात 5, दुसऱ्या डावात 3 विकेट आणि शतक झळकावले. दुसऱ्या डावात त्याची महत्त्वाची कामगिरी ठरली त्यामुळेच भारताला इंग्लंडवर विजय मिळवता आला. अश्विनला अक्षर पटेलने चांगली साथ दिली. अक्षरने पदार्पणात 5 विकेट घेतल्या.
आजचा सामन्याचा चौथा दिवस होता. इंग्लंडला विजयासाठी 429 धावांची गरज होती आणि भारताला केवळ 7 विकेट पाहिजे होत्या. गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाचांनी पाहुण्या इंग्लंड संघाला फिरकीची कमाल दाखवून दिली. इंग्लंडने कालच्या 3 बाद 54 वरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, अश्विनने इंग्लंडला धक्के दिले. अखेर इंग्लंडचा दुसरा डाव 164 धावांत संपुष्टात आला.