मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना व्हायरस संक्रमणाची 14,361 नवी प्रकरणे समोर आली आणि यासोबत संक्रमित लोकांची संख्या वाढून 7,47,995 झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकार्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या व्हायरसमुळे राज्यात मृतांची संख्या वाढून 23,775 वर पोहचली आहे. राज्यात एका दिवसात 331 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1,80,718 लोक कोरोना संक्रमित आहेत. बरे झाल्यानंतर 11,607 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बरे झालेल्या एकुण रूग्णांची संख्या 5,43,170 झाली आहे.
कर्नाटक-तमिळनाडुत स्थिती गंभीर
दुसरीकडे कर्नाटकमध्ये शुक्रवारी कोविड-19 चे 8,960 नवे रूग्ण आल्याने राज्यातील एकुण संक्रमितांची संख्या वाढून 3.18 लाख झाली. आरोग्य विभागाने सांगितले की, शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे आणखी 136 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यात एकुण मृत्यूंची संख्या 5,368 झाली आहे. तर, या कालावधीत 7,464 रूग्ण बरे झाले आहेत. आरोग्य विभागाच्या बुलेटिननुसार, राज्यात आतापर्यंत 2.27 लाख लोक संक्रमण मुक्त झाले असून 86,347 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 754 रूग्णांची स्थित गंभीर असल्याने ते आयसीयूमध्ये दाखल आहेत.
तर तामिळनाडुत शुक्रवारी 5,996 नव्या केस आल्या, यांनतर एकुण संक्रमितांची संख्या वाढून 4,09,238 झाली आणि 52,506 केस अॅक्टिव्ह आहेत. राज्यात आतापर्यंत 3, 49,682 लोक रिकव्हर झाले, तर 7050 लोकांचा मृत्यू झाला आहे.