बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या 5 वर्षांच्या सरासरी पाणी पातळीच्या(Increase in water) तुलनेत लातूर जिल्ह्यात या वर्षी 0.92 मीटरनं पाणी पातळी(Increase in water) वाढल्याचं दिसत आहे. येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं केलेल्या निरीक्षणावरून पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
सप्टेबरमध्ये दरवर्षी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून विहिरींचं निरीक्षण करून पाणी पातळीत वाढ झाली की, घट हे पाहिलं जातं. दरवर्षी या प्रमाणे याही वर्षी भूजल सर्वेक्षण यंत्रणेनं जिल्ह्यातील 109 विहिरींचं निरीक्षण केलं आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ बी एन संगनवार यांनीही अनेक विहिरींना भेटी देऊन निरीक्षण केलं. मागील 5 वर्षातील सप्टेंबरमधील सरासरी पाणी पातळी आणि या वर्षी निरीक्षणानंतर दिसून आलेली पाणी पातळी पाहता जिल्ह्याच्या पाणी पातळीत 0.92 मीटरनं वाढ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणी पातळीत औसा तालुक्याची वाढली आहे. ही पाणी पातळी 1.46 मीटर इतकी झाली आहे. त्या पाठोपाठ रेणापूर तालुक्याची वाढली आहे जी 1.21 मीटर इतकी आहे. लातूर तालुक्याची पाणी पातळी 1.01 मीटरनं वाढल्याचं या निरीक्षणानंतर दिसून आलं आहे.
मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत लातूर जिल्ह्याच्या पाणी पातळीत वाढ…
भूजल पातळीची तालुकानिहाय माहिती मीटरमध्ये पुढीलप्रमाणे- pic.twitter.com/w2HIGFPPYc— TimePass (@TimePassTalks) October 14, 2020
भूजल पातळीची तालुकानिहाय माहिती मीटरमध्ये पुढीलप्रमाणे-
तालुका 5 वर्षांतील सप्टेंबरची पातळी सप्टेंबर 2020 ची सरासरी झालेली वाढ
1) लातूर 5.55 4.54 1.01
2) औसा 6.41 4.95 1.46
3) रेणापूर 4.14 2.93 1.21
4) उदगीर 4.52 4.08 0.44
5) अहमदपूर 4.75 4.18 0.57
6) चाकूर 4.14 4.03 0.11
7) जळकोट 4.44 3.51 0.93
8) निलंगा 4.50 3.06 0.93
9) देवणी 3.02 1.88 1.14
10) शिरूर अनंतपाळ 4.42 3.58 0.84
एकूण 4.59 3.67 0.92