मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशभरात लोकसभेचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्षाचे उमेदवार या लोकसभेच्या रिंगणात आपआपले नशीब अजमावण्याच्या तयारीला लागले आहेत. आम आदमी पार्टीने मात्र राज्यात आपले उमेदवार उभे न करणायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यात आपच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या साथ देण्याची जाहीर केले आहे.
राज्यात लोकसभेच्या १५ जागा लढण्यास आपचे उमेदवार इच्छुक होते. व तशी यादी घेऊन दिल्लीला गेलेल्या नेत्यांना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात तुमची पुरेशी तयारी नाही. त्यामुळे लोकसभेची एकही जागा लढवू नका असे स्पष्टपणे सांगत उमेदवाराच्या पदरी निराशाच टाकली. त्यामुळे राज्यातील ‘आप’ च्या कार्यकर्त्यांनी ‘वंचित बहुजन आघाडीच्या’ प्रचारास सुरुवात केली आहे.