वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने लाईन ऑफ कंट्रोलवर (एलओसी) घुसखोरी करणार्या पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्याच तळात घुसून ठार मारलं. लष्कराच्या कारवाईमध्ये 7 पाकिस्तानी सैनिक ठार मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानामध्ये प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी तात्काळ राष्ट्रीय सुरक्षा समितीची तडकाफडकी बैठक बोलावली. बैठक संपल्यानंतर त्यांनी आज (रविवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक ट्विट केलं आहे. ते म्हणातात, भारतीय लष्कराने निष्पाप नागरिकांना मारले आहे. घुसखोरी करणार्यांना मारल्याचे फोटो देखील सार्वजनिक झाले असताना पाक पंतप्रधानांनी अशाप्रकारचे ट्विट केल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
I condemn India's attack across LOC on innocent civilians & it's use of cluster munitions in violation of int humanitarian law and it's own commitments under the 1983 Convention on Certain Conventional Weapons. UNSC must take note of this international threat to peace & security.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 4, 2019
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर जम्मू-काश्मीरमधील सर्व यात्रा दोन दिवसांपुर्वीच रद्द करण्यात आल्या होत्या. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती सरकारला मिळाली होती. त्यानंतर सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या. यात्रेकरूंना जम्मू-काश्मीर सोडण्यास सांगण्यात आले होते तर परदेशी पर्यटकांना देखील तात्काळ काश्मीर सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारनं काश्मीरमध्ये अतिरिक्त 28 हजार सैनिक पाठविले. त्यानंतर पाकिस्तानची टरकली असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या एका स्थानिक वृत्तपत्राने दिली.
तेव्हापासून एलओसीवर तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून एलओसीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. घुसखोरी करणार्या पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्याच तळात जावून ठार मारण्याची कामगिरी भारतीय लष्कराने केली. त्यामध्ये 7 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत निष्पाप लोक मारले गेल्याचे ट्विट केलं आहे.