बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारने कलम ३७० च्या माध्यमातून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करून त्याला केंद्र शासित प्रदेश बनविला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांच्या देशातच अडचणीत सापडले आहेत. जम्मू-काश्मीरबाबत भारतीय नेतृत्त्वाच्या निर्णयाबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेत संयुक्त अधिवेशन बोलावण्यात आले होते. पंतप्रधान इम्रान खान जेव्हा संसदेत काश्मीर प्रश्नावर उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते तेव्हा त्यांचा बोलण्यावरील ताबा सुटला होता.
दरम्यान संसदेत विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना इम्रानचा खान यांचा बोलण्यावरील ताबा सुटला. विरोधकांचा सल्ला घेताना ते म्हणाले की काश्मीरमधील भारतीय कारवाईला उत्तर देताना त्यांच्या सरकारने कोणती पावले उचलली पाहिजेत ते सांगा. इम्रान म्हणाले, मी कोणते पाऊल उचलले नाही, तरीही आमचे परराष्ट्र मंत्रालय सर्व देशांच्या राजदूतांशी बैठक घेत आहे. मी इतर देशांशीही संपर्क साधत आहे. आंतरराष्ट्रीय फोरमचीही मदत घेत आहे. त्यामुळे आता तुम्हीच मला सांगा मी अजून काय करावे ?
इम्रान पुढे म्हणाले, मी काल इस्लामिक सहकार संघटनेशीही बोललो. मी काय केले नाही, जे विरोधी आपल्याला आव्हान देत आहेत. आपण भारतावर आक्रमण करायच का ? असा सवाल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत केला. पुढे बोलताना इम्रान खान म्हणाले की सरकारला सर्व शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत, म्हणूनच त्यांनी अफगाणिस्तान, इराण आणि भारत यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. इम्रान म्हणाले की, आमचा मुद्दा समजण्याऐवजी नरेंद्र मोदींनी निवडणुकीत फायदा घेण्यासाठी पाकिस्तानविरूद्ध वक्तव्य केले आहे. मोदी सरकारने काश्मीरमध्ये जे केले ते त्यांच्या विचारसरणीला अनुरुप आहे. मोदी सरकार आरएसएसचा अजेंडा पुढे करत आहे. त्यांची ही विचारधारा नक्षलवादी आहे. असेही इम्रान खान म्हणाले.