बहुजननामा ऑनलाइन : भारत सरकारने ३७० कलम हटविण्याच्या निर्णयामुळे देशभरात जल्लोष सुरु आहे. जगभरात सध्या ह्याच निर्णयाची चर्चा सुरु आहे. यामुळे या मुद्द्यावर चित्रपट बनविण्यासाठी अनेक चित्रपट निर्मात्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. उरी- सर्जिकल स्ट्राईक सारख्या चित्रपटांच्या भरगोस यशानंतर , भारतातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चित्रपट बनवण्यासाठी निर्माते नेहमी उत्साही असतात.
त्यामुळे कलम ३७० हटविण्याच्या घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयावर चित्रपट बनविण्यासाठी सगळे निर्माते तयार झाले आहेत. आर्टिकल १५ च्या भरगोस यशानंतर प्रत्येकाला आता अश्याच गोष्टींचा शोध होता. त्यामुळे आता ३७० कलम हटविल्याने प्रत्येकाला त्यावर मोहोर लावण्याची घाई आहे.
याचे नवल मात्र एवढेच वाटते कि , अश्या घटनांच्या आधारे चित्रपट निर्माते पैसे कमवत आहेत. सध्या तरी आर्टिकल ३७०, आर्टिकल ३७० स्क्रॅप्ट, आर्टिकल ३७० ऐबोलिश्ड, काश्मीर ये तिरंगा तसेच हमारा कश्मीर अश्या नावांची यादी समोर येत आहे. पुलवामा घटनेच्या वेळी देखील असंच काहीस झालं होत. कोणत्याही चित्रपट निर्मात्याने पुलवामा घटनेवर चित्रपट बनविण्याची घोषणा केली नव्हती. परंतु अश्या राष्ट्रवादी घटनांवरील चित्रपट फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी राझी या चित्रपटाने १२२. ३९ कोटी ,केसरी ने १५१. ८७ तर उरी या चित्रपटाने २४४ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे अश्या राष्ट्रवादी चित्रपटांमुळे फिल्म इंडस्ट्री भरगोस कमाई करताना दिसत आहे.