पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरी नक्षलवादाच्या नावाखाली येथील विचारवंतावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. देशांत घटनेने दिलेला विचार व्यक्त करण्याचा अधिकार विचारवंतांना व नागरिकांना नाही का? असा सवाल पवारांनी केला.असेच पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांना पाठिंबा दिला. शिवगौरव शिवसन्मान सोहळ्यात शरद पवार बोलत होते. यावेळी विचारपिठावर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील. लेखक प्रताप गंगावणे. अभिनेते शंतनू मोघे. शाहीर दादा पासलकर. विकास पासलकर आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणले कि न्या. पी. बी. सावंत यांचे सामाजिक काम सर्वत्र पोचवण्याचे कार्य कोळसे-पाटील करत आहेत.आम्ही सत्तेत असतो तर येथील विचारवंतावर व साहित्यिकावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस आयुक्तांना निलंबित केले असते. बि. जी. कोळसे पाटलांना येथील सरकार सत्तेचा गैरवापर करुन त्यांना अडचणीत आणू पाहत होते. पण कोर्टाने निकाल दिल्यानंतरही त्यांना काही अधिकारी सत्तेचा गैरवापर करुन त्यांना अडचणीत आणू पाहत होते. त्यांना एका खट्ल्यातून दुसऱ्या खट्ल्यात अडकवण्यचा प्रयत्न सरकारने केला. महाराष्ट्राचे प्रशासन असे चालणार नाही. असे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. असेही पवार म्हणाले.
बी.जी.कोळसे-पाटील यांनी मोदी आणि शहा यांच्यावर सडूकुन टीका केली. हे दोन गुंड देशाला बरबाद करत आहेत. गोध्रा. अहमदाबाद आणि आता पुलावामाही त्यांनीच घडवून आणले आहे. असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. मिलिंद एकबोटे. संभाजी भिडे यांनी दंगल घडवली. त्याचे पुरावे आहेत. मात्र काहीही कारवाई झाली नाही. मोदी यांनी केलेल्या खुनाची यादी ऐकली तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. असे हि कोळसे पाटील म्हणाले.