मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वंचितांना सत्ता हवी असल्यास माझ्यासोबत यावे, प्रकाश आंबेडकरांसोबत गेल्यावर सत्ता मिळणार नाही. अशी टिका वंचित बहुजन आघाडीवर करत रिपब्लीकन पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मी लोकसभेत जाणार मग शरद पवार राज्यसभेत कसे. असे म्हणत पवारांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याच्या बातम्यांमुळे आपणास आनंद झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
राज्यात भाजप-शिवसेनेची युती होईल, असा विश्वास व्यक्त करत रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवली. आपण मुख्यमंत्र्यांकडे दक्षिण मध्य मुंबईतील जागेबाबत बोललो आहे, आता उद्धव ठाकरेंशीही बोलणार असल्याचे आठवले म्हणाले.
येत्या लोकसभा निवडणूकीच्या जागांसंदर्भात वाटाघाटी आणि योग्य उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच भाजपा-शिवसेना युती व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही आठवलेंनी सांगितलं. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या मागे गेल्यास वंचितांना सत्ता मिळणार नाही. त्यांनी माझ्यासोबत यावे. वंचित बहुजन आघाडीचा फायदा महायुतीलाच होणार आहे. अशी टिका त्यांनी केली.