बहुजननामा ऑनलाइन टीम – दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया ( Austrelia) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ जागतिक कसोटी विजेतेपदासाठी चार कसोटी सामने खेळणार आहे. सध्या या जागतिक कसोटी विजेतेपदासाठीच्या क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर होता. परंतु नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट ( International Cricket) परिषदेने जागतिक कसोटी विजेतेपदासाठीच्या एका नियमात बदल केला आहे. ‘कोरोनाच्या (Corona) संकटामुळे जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघांचा निर्णय गुणांच्या टक्केवारीच्या आधावर घेतला जाईल’, असं आयसीसीनं ( ICC) जाहीर केलं आहे.
🚨 #WTC21 UPDATE 🚨
Following an ICC Board meeting today, it has been confirmed that the finalists of the ongoing ICC World Test Championship will be decided by percentage of points earned.
🏆 Which two teams will be going head-to-head for the trophy next year?
Details 👇
— ICC (@ICC) November 19, 2020
आयसीसीच्या या निर्णयामुळे भारताला मोठं नुकसान झालं आहे. गुणांच्या आधारावर भारतीय संघ अव्वल स्थानी होता. मात्र, आयसीसीच्या नव्या नियमाचा फटका भारतीय संघाला बसला आहे. त्यानंतर आता नवीन नियमानंतर भारतीय संघाला मागे टाकून आता ऑस्ट्रेलियाचा ( Austrelia) संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या एकूण मालिका आणि मिळवलेले गुण यांची टक्केवारी ८२.२ इतकी होते, तर भारतीय संघाच्या गुणांची टक्केवारी ७५ इतकी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक गुण असूनही भारतीय संघाची आता गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
दरम्यान, या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडे आतापर्यंत चार मालिकांमध्ये ३६० गुण आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ३ मालिकांमधील २९६ गुण आहेत. त्यामुळे या कसोटी मालिकेत ऑस्ट्रलियाविरुद्ध भारतीय संघाला उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. नाही तर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगू शकते.