मुंबई बहुजननामा ऑनलाइन – कालच्या राजकीय नाट्यानंतर आता अजित पवार यांनी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याचे कारण सांगितले, ते म्हणाले की शरद पवारांचा या बँक प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, ज्या साहेबांमुळे मी इथपर्यंत पोहचलो. शिखर बँक प्रकरणात साहेबांचे कोणत्याही कारण नसताना नाव घेण्यात आले. माझ्यामुळे साहेबांची बदनामी होत आहे. या विचारातून मी साहेबांनाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतला, त्यांना मी फोन बंद केला.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते, ज्यात जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगळ भुजबळ यांचा समावेश होता. या पत्रकार परिषदेत शरद पवार मात्र उपस्थित नव्हते. काल राज्यात मोठे राजकीय नाट्य घडले. शरद पवार आणि ईडी प्रकरणादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी अचानक आपला आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते नॉट रिचेबल होते.
त्यांना सर्वांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू संपर्क झाला नाही. त्यामुळे कारण अस्पष्ट राहिले होते, यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी राजीनामा का दिला याची माहिती दिली आणि आपली भूमिका मांडली. आज शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर कुटूंबीयांची चर्चा झाली. यात अजित पवार हजर होते. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी सांगितले की चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.
Visit : bahujannama.com