बहुजननामा ऑनलाईन टीम
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतवर जोरदार टीका सुरु आहे. टीकेला उत्तर देतानाच कंगनाने आता जय मुंबई, जय महाराष्ट्रचा नारा दिला आहे. महाराष्ट्रासह सर्वत्र असलेल्या मित्रपरिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे. माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दल मला प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे असे कंगनाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
No words to express my gratitude for my friends from everywhere including Maharashtra, they know my intentions and I don’t need to prove my love for my Karmbhoomi Mumbai who I always referred to as Maa Yashodha who adopted me,Jai Mumbai Jai Maharashtra 🙏#indiawithkanganaranaut pic.twitter.com/Xp4DUahbUu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
कंगनावर सध्या कला आणि राजकीय क्षेत्रातून जोरदार टीका होत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्याने भाष्य करत असलेल्या कंगनाने मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असे कंगना म्हणाली होती. कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर तिने परत येऊ नये असे राउत म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यामुळे राजकारण पेटले आहे.