बहुजननामा ऑनलाईन टीम : हैदराबादमध्ये बलात्कार आणि निर्घृण खून केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संताप व्यक्त होत असून, संसदेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. या संदर्भात पीडितेच्या वडीलांनी आरोपींना लवकरात लवकर शिक्षेची मागणी केली आहे. ते म्हणाले कि, गुन्हेगार अल्पवयीन आहेत, परंतु त्यांनी केलेले कृत संतापजनक आहे. ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, प्रथम निर्भयाच्या आरोपींना सोडण्यात आले आणि आता ही घटना घडली. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच पीडितचे आईचे म्हणणे आहे की, ‘मुलीला जसे जाळले तश्याच पद्धतीने गुन्हेगारांना जाळले जावे.’
पोलिस सीसीटीव्ही फुटेज पहातच राहिले :
पीडित मुलीचे वडील म्हणतात की, जेव्हा मुलीचा फोन आला तेव्हा ते घरी नव्हते. ते कोल्हापुरात होते. दरम्यान, संपूर्ण प्रकरणात पोलिसांची मनोवृत्ती अत्यंत शिथिल असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरुवातीला पोलिस घटनास्थळी गेले नाहीत आणि त्यांनी फक्त सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले. मात्र पीडित महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली नाही. पोलिसांनीही पीडित मुलीवरच शंका घेत ती कुठे तरी गेली असेल असे बोलू लागले. पीडित बहिणीने सांगितले की, या घटनेपासून तिने घर सोडले नाही. पोलिसांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. जर तिला वेळेत मदत मिळाली असती तर ती वाचली असती. दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी बहिणीची मागणी आहे.
घरापासून फक्त २ किमी अंतरावर घडली घटना
पीडित बहिणीने सांगितले की, ती आपल्यापेक्षा दीड वर्ष मोठी आहे. ती सर्वांना मदत करायची. जिथे ही घटना घडली ती जागा घरापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर आहे. जेव्हा बहिणीचा कॉल आला तेव्हा तेथे फक्त ६मिनिट चर्चा होती. तिने सांगितले की, तिच्या फोनमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा आहे आणि बहिणीसह तिचा शेवटचा कॉल रेकॉर्ड झाला आहे, ज्यामध्ये ती घाबरलेली होती.
तिने आपली स्वप्ने पूर्ण केली
वडील म्हणाले की, ती एक अतिशय हुशार मुलगी होती. तिने आपली सर्व स्वप्ने पूर्ण केली होती. दररोज १४-१४ तास अभ्यास करत असे. ५ वर्षे खूप मेहनत करत ती डॉक्टरेट केली. तिने सर्व्हिस कमिशनची परीक्षा पास केली आणि ३ वर्षे काम केले. तसेच आम्ही २-३ महिन्यात तिच्या लग्नाची देखील तयारी कारणार होतो. तिची पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची इच्छा होती. पण लग्नानंतर ती पीजी करणार होती.
मुलांनाही संस्कार दिले पाहिजेत: वडील
पीडितेच्या वडील म्हणाले, मुलांनाही संस्कार देण्याची गरज आहे. घरातूनच संस्कार दिले तर अश्या प्रकारच्या घटनांना आळा बसू शकेल. तसेच मुलींमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. या संदर्भात मुलींनीही पोलिसांना जागरूक केले पाहिजे. पोलिसांनी जनजागृतीसाठी कार्यक्रम केले पाहिजे त्यासाठी एक मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण १०० नंबरवर माहिती देण्यासाठी बराच वेळ लागतो. जेव्हा आपण कॉल करता तेव्हा १ नंबर डायल करा. २ नंबर डायल करा. त्यासाठी बराच वेळ लागतो. ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुधारली जावी.
Visit : bahujannama.com