रायगड : बहुजननामा ऑनलाईन – आजवर मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळं त्यांच्या कर्तुत्वाबद्दल हे पुरस्कारच बरंच काही सांगून जातात असं म्हणत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांची बाजू मांडली.
रोहा तालुक्यातील तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तांबडी येथे येऊन पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संपर्क साधला.
बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते. यानंतर तो सीबीआयकडे सोपवावा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. यानंतर प्रचंड वाद झाला. विविध माध्यमांतून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले.
यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कारच त्यांची कार्यक्षमता काय आहे हे सिद्ध करतात. त्यामुळं आमच्या पोलिसांना त्यांची कार्यक्षमता सिद्ध करण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी स्पष्ट करत मुंबई पोलिसांची बाजू मांडली.