बहुजननामा ऑनलाइन टीम : राज्यात सध्या सत्तास्थापनेवर गोंधळ चालू असताना आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरु आहेत. पुन्हा एकदा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला आहे. बोलताना राऊत म्हणाले की, राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या झाली आहे. भाजपने अस्मितेशी छेडछाड करु नये.
पुढे राऊत म्हणाले की, ‘आमच्याकडे १६२ आमदारांचे बहुमत होते मात्र ज्यावेळी बहुमत चाचणी घेतली जाईल त्यावेळी आमदारांचा आकडा पार होऊन १७० वर जाण्याचा आम्हाला विश्वास आहे. बहुमताचे बनावट पत्र दाखवून भाजप सरकार हे सत्तेवर आले आहे. विधिमंडळाचे पक्षनेते राष्ट्रवादीचे जयंत पाटील हेच आहे आणि त्यांच्याकडे सर्व अधिकार आहे. संविधानामध्ये असे आहे की, ज्याच्याकडे बहुमत आहे तोच सत्ता स्थापनेची शपथ घऊ शकतो.’
अजित पवार यांच्या आत्ताच्या कार्याबद्दल मी काय सांगू शकतो, असा टोला संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला. त्याचबरोबर अशा जागतिक स्तरावरील नेत्यांविषयी मी बोलणार नाही, असे देखील राऊत म्हणाले. राज्यात भाजपने सत्ता स्थापन केल्यामुळे सगळीकडे खूप उलथा-पालथ झाली आहे.
Visit : bahujannama.com