मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपत विधी व्हावा आणि येत्या २४ तासामध्ये म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी व्हावी असे आदेश दिले आहेत. त्यावर आता वेगवेगळ्या राजकीय गटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी आम्ही तयार आहोत आणि आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू असे मत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांची बैठक तातडीने वर्षा बंगल्यावर बोलवली आहे. त्यातच आम्ही उद्या बहुमत नक्कीच सिद्ध करू असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Floor test in Maharashtra Assembly on Nov 27 before 5 pm, orders Supreme Court
Read @ANI Story | https://t.co/tqDycKMScK pic.twitter.com/gNInjdjMfk
— ANI Digital (@ani_digital) November 26, 2019
उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी करा आणि त्यानंतर लगेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी करावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच बहुमत चाचणी दरम्यान मतदान हे गुप्त पद्धतीने होणार नाही तर याबाबत लाईव्ह टेलिकास्ट व्हावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस सरकार आपले बहुमत सिद्ध करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यासंबंधीच्या हालचाली देखील सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या असल्याचे पहायला मिळणार आहे.
Visit : bahujannama.com