मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे. विविध वादग्रस्त विधाने, राजकीय निर्णय आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या अपमानकारक वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी नेहमीच चर्चेत राहिले. वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. चौफेर टीकेनंतर भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राष्ट्रपतींकडे (President) राजीनामा पाठवून दिला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आले. महाराष्ट्रातून परत जाणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांचे राष्ट्रवादीने (NCP) प्रगती पुस्तक (Pragati Book) प्रसिद्ध केले आहे. तसेच शेरा देताना खोचक टोला लगावला आहे.
https://www.facebook.com/photo/?fbid=743554057138265&set=pcb.743554393804898
भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचे प्रगती पुस्तक राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊटवरुन प्रसिद्ध केले असून हे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व महाराष्ट्र भाजपला (Maharashtra BJP) टॅक केले आहे. प्रगती पुस्तकावर प्रगती या शब्दावर फुली मारुन ‘अधोगती पुस्तक’ असं नाव दिले आहे. तसेच नावाचा उल्लेख भगतसिंह श्यारी असा करुन ते व्हॉट्सअॅप विद्यालयातील ‘ढ’ तुकडीमधील असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रगती पुस्तकामध्ये त्यांना इतिहासात शून्य मार्क देऊन टोला लगावला आहे. सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या विद्यार्त्याची वर्तणूक पाहता याची सुरुवात बालवाडीपासून सुरु करणे योग्य राहील असा शेरा देत टोला लगावला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यासोबत एक पत्र जोडण्यात आले आहे. यावर जे कोणी संबंधित असतील त्यांच्यासाठी, असे लिहिण्यात आले आहे. पत्रात लिहिले की, पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे.
या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे.
आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्याने केले आहे.
तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो.
या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे या विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी, ही विनंती,
असे पत्रात म्हटले आहे. यावरुन नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Governor Bhagat Singh Koshyari | ncp released governor bhagat singh koshyaris pragati book gave a comment
हे देखील वाचा :
Ahmednagar Crime News | धक्कादायक ! सहलीसाठी शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा; विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही रुग्णालयात दाखल
Hingoli Accident News | धक्कादायक! कुटुंबाच्या भेटीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू