नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची अर्थव्यवस्था मंदावते आहे. अनेक मोठ्या कंपन्यामध्ये मंदी असल्या कारणामुळे लोकांना काढले जात आहे तर कोल इंडिया कंपनी या उलट चालते आहे. कोल इंडिया कंपनी लोकांना रोजगार मिळवून देत आहे. कोल इंडियाची ९००० लोकांना नोकरी देण्याची योजना आहे. यापैकी कार्यकारी स्तरावर सुमारे ४००० लोकांना नियुक्त केले जाईल. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोल इंडियाच्या ४०० अधिकाऱ्यांपैकी ९०० जणांची कनिष्ठ प्रकारात जाहिरात व मुलाखतीद्वारे नियुक्ती केली जाईल. उर्वरित ४०० लोकांची निवड कॅम्पस निवडीद्वारे केली जाईल. वैद्यकीय कर्मचारी म्हणून १०० अधिकारी नियुक्त केले जातील.
४०० नॉन टेक्निकल पोस्ट्ससाठी भरती
अधिकाऱ्याने सांगितले कि कंपनी ने आधीच ४०० एग्जिक्यूटिव लोकांची भरती केली आहे, ज्यात जास्ततर डॉक्टर आहेत. ७५ अजून पदांच्या पण नियुक्त्या केल्या आहेत.बाकी २२०० लोकांची नियुक्ति कंपनी परीक्षेच्या माध्यमातून करणार आहे. कंपनीच्या उप कंपन्या ५००० वर्कर्स आणि टेक्निकल कामगारांच्या नियुक्त्या करतील. २३०० नोकऱ्या या ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्यासाठी दिल्या जाणार आहेत. २३५० नोकऱ्या त्यांना दिल्या जातील ज्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू काम करताना झाला होता. यासोबतच ४०० नॉन टेक्निकल पोस्ट्स वरती सुद्धा भरती होणार आहे.
वर्कर्स आणि टेक्निकल कामगारांची भरती
मागच्या अनेक वर्षांपासून इतकी मोठी मेगा रोजगार भरती कोणत्याही सरकारी कंपनीमध्ये झालेली नव्हती. एग्जिक्यूटिव कामगारांची निवड कोल इंडिया करणार आहे, तर वर्कर्स आणि टेक्निकल एंप्लॉयीजची हायरिंग कोल इंडियाशी कनेक्टेड उपकंपन्या करणार आहे. मागच्या वर्षी कंपनीने १२०० लोकांची भरती केली होती.
Visit : bahujannama.com