बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने आज तिसर्या मदत पॅकेज (ईांपळीलहरी इहरीरीं रिलज्ञरसश 3.0) ची घोषणा केली. या पॅकेजमध्ये सरकारने रोजगार, शेतकरी आणि इन्फ्रावर फोकस ठेवला आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी देशातील 14 कोटी शेतकर्यांसाठी मोठी घोषणा केली. सरकारने फर्टिलायझर सबसिडी म्हणून 65,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.(Modi government) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले की, अलीकडचे आकडे अर्थव्यवस्थेतील सुधारणेचे संकेत देत आहेत. आगामी काळात अर्थव्यवस्थेत रिकव्हरी होईल.
फर्टिलायझर सबसिडीची घोषणा
सरकार तिसर्या मदत पॅकेजच्या अंतर्गत फर्टिलायझर सबसिडी म्हणून 65,000 कोटी रुपये देणार आहे. यातून शेतकर्यांना रास्त भावात फर्टिलायझर उपलब्ध होईल.
14 कोटी शेतकर्यांना फायदा
फर्टिलायझर सबसिडीतून 14 कोटी शेतकर्यांना फायदा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
गरिबांसाठी खास घोषणा
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी सरकारने 10,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
सरकारने ही घोषणा इन्कम टॅक्स दिलासा म्हणून केली आहे. हाउसिंग क्षेत्रात हा फायदा घर बांधणारे आणि खरेदी करणारे दोघांना मिळेल. घर विकण्यात अगोदर सर्किल रेट आणि व्हॅल्यू रेटमध्ये 10 टक्केची सूट वाढवून आता 20 टक्के केली आहे. म्हणजे प्रॉपर्टीची व्हॅल्यू घसरूनही कोणतेही घर सर्किल रेटमुळे विकले जात नव्हते, आता तेथे 20 टक्के सूट देण्यात आली आहे, जेणेकरून घरे विकली जावीत आणि लोक रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकतील. ही स्कीम 30 जून 2021 पर्यंत लागू असेल.
आत्मनिर्भर पॅकेजचा या लोकांना मिळाला फायदा
अर्थमंत्री म्हणाल्या की, आत्मनिर्भर भारत अंतर्गत उचललेल्या पावलांमुळे मजुरांना खूप फायदा झाला आहे. अशाप्रकारे शेतकर्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नांचासुद्धा चांगला परिणाम दिसून आला. आत्मनिर्भर भारत अंतर्गत ईसीएलजीस स्कीम अंतर्गत 61 लाख लोकांनी लाभ घेतला. यामध्ये 1.52 लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत आणि 2.05 लाख कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. इन्कम टॅक्स विभागाने सक्रियता आणि वेग दाखवत 1.32 लाख कोटी रुपयांचा रिफंड दिला आहे.