बहुजननामा ऑनलाईन – आता लवकरच उरलेले अन्न हे दुसऱ्यांना दान करू शकतो. वाचलेले अन्न किंवा शिल्लक राहिलेले अन्न आता ज्यांना गरज आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फूड सेफ्टी अँड स्टूडेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया घेऊन येणार आहे एक नवीन ॲप. यासाठी FSSAI लवकरच एक मोबाईल ॲप लॉन्च करणार आहे. अधिकाऱ्यांच्या नुसार नोटिफिकेशन प्रगतीपथावर आहे. याच्या नियमांना पुढच्या जुलैपासून सुरुवात होणार आहे. या एजन्सीमध्ये काम करणाऱ्या स्टाफ ची ट्रेनिंग अनिवार्य असणार आहे. यामध्ये असणाऱ्या कंपन्यांनाही रजिस्ट्रेशन करावा लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यातही येणार आहे.
खाद्य व्यापारी लवकर खराब होणारे पदार्थ नष्ट करतात
एफएसएसएआयच्या अनुसरे, भारत हा जगातील दुसरा सगळ्यात मोठा अन्न उत्पादन करणारा देश आहे. तर भारत हा जगातील सर्वात जास्त भुक्या व्यक्ती असणाऱ्या ११९ राष्ट्रांमध्ये हा १०३ क्रमांकावर आहे. काही प्रोटोकॉल च्या कारणांमुळे खाद्य व्यवसायातील जे अन्नपदार्थ लवकर खराब होतात अशा अन्नपदार्थ नष्ट करण्याच्या मार्गावर नागरिक असतात. अशा या अन्नाची नासाडी रोखण्यासाठी आणि असे हे अन्न भुक्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच एक नवीन ॲप ची सुरुवात होणार आहे. त्यामुळे अन्न वाया जाणार आणि अन्नाची नासाडी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
एफएसएसएआयने फूड रिकवरी सिस्टीम सुरू केली
एफएसएसएआयने फूड रिकवरी इकोसिस्टीम बनवले आहे. ज्याला ‘भोजन बचाव, भोजन बाटो, खुशिया बाटो’ या नावाने हा अभियान सुरू करण्यात आला आहे. या अभियानाचा उद्देश एवढाच आहे की, अन्नपदार्थ बनविणार्या कंपन्या, वितरण करणाऱ्या एजन्सी आणि लाभार्थी यांच्यातील दुरावा कमी करणे. याअंतर्गत अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकांकडून अन्नपदार्थ एकत्रित करणाऱ्या एजन्सींना सध्या ट्रेनिंग देणे सुरू आहे. एजन्सीचे नोंदणी आणि प्रशिक्षण ही पूर्ण झाले आहे. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी यामध्ये रजिस्ट्रेशन केले आहे तर काही कंपन्या सध्या प्रशिक्षण घेत आहेत.