पणजी : बहुजननामा ऑनलाईन – देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाले असताना गोव्याची राजधानी पणजी शहरापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘निरंकाल दाभाळ’ येथील १०० (वानरमारे) जमात असून ४० जणांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये २० महिलांचा समावेश आहे. लोकसभेसाठी मतदान करण्याची संधी पहिल्यांदाच त्यांना मिळाली आहे. तसेच पुढील पोटनिवडणुकीत शिरोडा विधानसभा त्यांना मतदान करता येईल.
काही जागृत नागरिकांनी पुढाकार घेऊन २०१७ साली त्यांना विधानसभा मतदानाचा हक्क मिळवून दिला होता.हे गावकरी पहिल्यांदाच लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. हे गावकरी पाहिलांदाच दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून मतदान करणार आहेत.वानरांना मारणारी ही जमात दाट जंगलात वास्तव्य करुन होती. नंतर ती निरकाल या गावी स्थायिक झाली.
सामाजिक कार्यकर्ते दिवंगत सतिश सोनक आणि कृषीतज्ञ सतीश तेंडुलकर यांनी पुढाकार घेऊन या जमातींना मतदानाचा अधिकार मिळून दिला. त्यांना रेशन कार्डे मिळवून देण्यात अनेक वर्षे गेली.आधार कार्ड तसेच मतदार कार्डे मिळवून देण्यातही बऱ्याच अडचणी आल्या. पहिल्यादांच मतदानाचा हक्क मिल्यानंतर गावकऱ्यांची प्रतिकिया घेतली असता. आम्ही मुख्य समाजधारेपासून दूर होतो. त्यांना त्याच्या अपेक्षा विचारल्या असता ६५ वर्षीय ज्येष्ठ वानरमाऱ्याने सांगितले की स्वच्छतागृहे आणि वीज पुरवठा या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत.