पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पी.एच.डी. करणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर जेआरडी टाटा फेलोशिप देण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाला पर्याय म्हणून ही फेलोशिप देण्यात येणार आहे.
विद्यापीठाने एमफील,पीचडी च्या विद्यार्थ्यांचे अचानकपणे विद्यावेतन बंद केले. त्यामुळे विध्यार्थी गेली ७ दिवसापासून आंदोलन करीत आहेत. त्यांचे म्हणने आहे कि विद्यापीठांनी सर्व संशोधक विध्यार्थाना विद्यावेतन दिले पहिजे. विध्यार्थाना गुणवत्तेच्या आधारावर १०० विद्यार्थ्यांना जेआरडी टाटा फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला.पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिना 8 हजार तर एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते.
पण विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मिळणाऱ्या निधीतून पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जात होते. मात्र, हा निधी बंद झाल्याने निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमिवर गुणवत्तेच्या आधारावर शंभर विद्यार्थ्यांना जेआरडी टाटा फेलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, जेआरडी टाटा फेलोशिपसाठी विभागनिहाय येणाऱ्या अर्जांच्या प्रमाणानुसार त्या त्या विभागांच्या फेलोशिपची संख्या निश्चित केली जाणार आहे. फेलोशिपसाठी गुणवत्तेचे निकष काय असावेत याचा निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाईल. त्यानंतर पी.एच.डीच्या विद्यार्थ्यांकडून फेलोशिपसाठी अर्ज मागविले जाणार आहेत. हा निर्णय आंदोलन कर्त्याच्या प्रतिनिधना कळवण्यात आले आहे.