मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे दैनंदिन व्यवहारावर लावण्यात आलेले निर्बंध अद्याप हटवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय अद्यापही ठप्प आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिलांनी आधीच हातामध्ये पैसे नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच वाढीव विजबिलं हातात पडली आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. वाढीव विजबिलविरोधात मनसेने आवाज उठवून राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. मनसेच्या या खळ्ळखटॅक आदोलनाच्या पार्श्वभूमीवर अदानी सुमाहाचे सीईओंनी कृष्णकुंजवर धाव घेतली आहे.
अदानी समुहाचे सीईओ आणि शिष्टमंडळाने कृष्णकुंजवर धाव घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांना आलेली वीजबिले ही जास्त आहेत. त्यामुळे जनता त्रस्त आहे. अशा परिस्थिती जनतेला बिलांमध्ये सूट देऊन दिलासा द्या. अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक झाल्यास मनसे सामान्य जनतेच्या बाजूने उभी राहील, असा इशारा राज ठाकरे यांनी अदानी समूहाला दिल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.
दरम्यान, वाढीव विजबिलांबाबत अदानी समूहाने राज्य सरकारसोबत लवकरात लवकर वाटाघाटी कराव्यात. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीमुळे पैसा नाही, अशा परिस्थितीत वीजबिलांत दिलासा न दिल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर कुणाचेही नियंत्रण राहणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.