बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब यांना अटक केल्यानंतर भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली; परंतु मानसिकता कायम आहे असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आणीबाणीचं समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
आपातकाल 1977 में ख़त्म हुआ पर मानसिकता बनी रही।
आपातकाल का समर्थन करनेवाली कांग्रेस- शिवसेना साथ आने के बाद उसी मानसिकता का दर्शन दे रहे है।
सरकार विरोधी हर आवाज को कुचलने का प्रयास लोकतंत्र पर धब्बा है। भारत ने एक ही बात सीखी है, हर ज़ोर ज़ुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है।— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2020
प्रकाश जावडेकरांचीही राज्य सरकारवर टीका
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईत पत्रकारितेवर जो हल्ला झाला आहे तो निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी आहे. आम्ही या कारवाईचा निषेध करतो असं जावडेकर म्हणाले आहेत.