बहुजननामा ऑनलाइन टीम – बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, अंस मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत, देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आहे. आता जमिनीवरचे काम त्यांनी सुरु करायला हवं, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील मंदिरे आणि जीम सुरु करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असे संकेत दिले.
संजय राऊत पुढे म्हणाले, काँग्रेसमध्ये जे काय घडलं, त्यावर काँग्रेसने बोलले पाहिजे. काँग्रेस हा देशातील माहित असलेला मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. देशात मजबूत विरोधीपक्षाची गरज आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरावं आणि जमिनीवर काम करावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. संजय जाधव यांनी नाराजूतून खासदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी असतेच. संजय जाधव मुंबईत आले आहेत. मार्ग निघेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.