बहुजननामा ऑनलाइन टीम – अर्णब गोस्वामी यांचा भाजपशी थेट संबंध आहे. ते भाजपसाठी काम करतात. भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनेलमध्ये भागीदार होते. देवेंद्र फडणवीस(Fadnavis ) सरकारनं अन्वय नाईक यांचं आत्महत्या प्रकरण समोर येऊ दिलं(Fadnavis ) नाही,’ असा मोठा गंभीर आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
अन्वय नाईक आत्महत्या, यामुळे ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना झाली. या अटकेनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या या व्यवहारावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक व ठाकरे कुटुंबांमध्ये जमीन व्यवहार झाल्याची माहिती पुढं आणली आहे. मात्र, नाईक कुटुंबीयांनी हे सगळे व्यवहार खुले असल्याचं म्हटलं आहे. तसंच अर्णब गोस्वामी यांना पाठीशी घालण्यासाठी सोमय्या हे आरोप करत असल्याचं आज्ञा नाईक यांनी म्हटलं आहे.
सचिन सावंत, काँग्रेस नेते याचं ट्विट
मराठी कुटुंबाची वाताहत झाली. त्याचे सोमय्या यांना काहीही पडलं नाही. अन्वय नाईक यांची आत्महत्याचा व जमीन व्यवहारचा काय संबंध ? नाईक यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या आहेत. सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मध्ये आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली.