मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आपण कुठलाही पॅकिंग असलेला पदार्थ एक्सपायरी दिनांक बघून घेत असतो. तसेच जर एखाद्या पदार्थाची एक्सपायरी दिनांक संपली असेल तर ते पदार्थ फेकून द्यावे लागता. जेवण किंवा एखादा पदार्थ खराब झाला असेल तर आपण वास घेऊन ठरवतो की तो पदार्थ चांगला आहे की नाही. मात्र आता वास घेण्याची गरज पडणार नाही, कारण एखादा पदार्थ खराब झाला की नाही हे आता एक सेन्सर ओळखणार आहे.
लंडनमधील इम्पीरियल कॉलेजने तयार केलेल्या सेन्सरमुळे खाद्यपदार्थांना खराब करणाऱ्या अमोनिया आणि ट्रायमिथायलामाइनचे प्रमाण समजते. यामुळं पदार्थ खराब झाला आहे की नाही हे समजतं. तसेच हे सेन्सर इको फ्रेंडली असून स्मार्टफोनला जोडून पॅकेज फूड खराब झाले आहे की नाही हे पाहता येईल. त्याचप्रमाणे हा सेन्सर पेपरवर आधारित असल्याने याला इलेक्ट्रिकल गॅस सेन्सर असं नाव देण्यात आलं आहे.
संशोधकांच्या माहितीनुसार, या सेन्सरमुळे पॅकेज फूडवर एक्स्पायरी डेट लावण्याची गरज नाही. कारण हे सेन्सर लावल्यास तुम्हाला त्या पदार्थाची अचूक माहीती मिळणार आहे. तसेच डॉ. फिरात गुडेर यांनी सांगितलं की, हा एकमेव सेन्सर आहे जो व्यावसायिक स्तरावर वापरता येईल. याची किंमत फक्त दीड रुपया असल्यानं वस्तुच्या किंमतीतही फारसा फरक पडणार नाही.