बहुजननामा ऑनलाईन टीम – नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्यात आज ‘भारत बंद’ची हाक दिली असून, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार (BJP leader MLA Ashish Shelar) यांनी ‘भारत बंद’वर जोरदार टीका केली आहे. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, असा घणाघात शेलार यांनी विरोधकांवर केला आहे.
मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…?कोणी कामगारांना फसवलं..?कोणी कामगारांना उध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..?
माझ्या शेतकरी बांधवानो,
तुम्ही आठवा थोडे मागचे,
मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत
डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2020
■काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का?
■काँग्रेसने स्वतः जे केले त्या विरोधातच भारत बंद?काँग्रेसच्या फसवणूकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2020
आमदार शेलार यांनी एक ट्विट केले आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना कुणी संप करायला लावला? कुणी कामगारांना फसवले? कुणी कामगारांना उद्ध्वस्त केले? कुणी मालकांचे फायदे करून दिले, असा सवाल उपस्थित करत शेलार पुढे म्हणाले की, माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, अशी टीका शेलार यांनी केली आहे. शेलार यांनी आणखी एका ट्विटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात राज्यात झालेल्या कृषी कायद्याबाबत भाष्य केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात राज्यात शेतीविषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का ? काँग्रेसने स्वत: जे केले त्याविरोधातच भारत बंद? काँग्रेसच्या फसवणुकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहनही शेलार यांनी केले आहे.