नवी : दिल्ली वृत्तसंस्था – पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावर एकामागे एक झटके मिळताना दिसत आहेत. अनेक प्रयत्न करुनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायात या मुद्द्यावर समर्थन मिळत नाही. कधी इम्रान खान या मुद्द्यावर गुडघे टेकवतात तर कधी ते पाकव्याप्त काश्मीरमधील तरुणांना भारतात घुसखोरी करण्यासाठी उकसवतात. यावेळी युरोपीय संघाच्या संसदेने काश्मीर मुद्द्यावरून पाकला झटका दिला आहे.
युरोपीयन कंजरव्हेटीव्स अँड रिफॉर्मिस्ट समूहानं म्हटलं की, आपण भारताचं समर्थन करायलं हवं युरोपीयन कंजरव्हेटीव्स अँड रिफॉर्मिस्ट समूहाचे रिस्जार्द कजार्नेकी म्हणाले, “भारत जगातील महान लोकशाहीपैकी एक आहे. पोलंडने म्हटलं, “आपल्याला भारतात खास करून जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना पाहायला हवं. भारतात हल्ला करणारे दहशतवादी चंद्रावरून नाही येत. ते शेजारच्या देशातूनच येतात. आपण भारताचं समर्थन करायला हवं.”
Ryszard Czarnecki, European Conservatives&Reformists Group,Poland: India is the greatest democracy of the world. We need to look at terrorist acts that took place in India,J&K.These terrorists didn't land from moon.They were coming from neighboring country.We should support India pic.twitter.com/Q0zdYWd8F8
— ANI (@ANI) September 18, 2019
दहशतवादी पाकिस्तानातून युरोपात दहशतवादी हल्ल्याचा कट रचू शकतात.
युरोपीय पीपल्स पार्टीचे फल्वियो मार्शिलो युरोपीय संसदेत म्हणाले, “पाकिस्तानने आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तान असा देश आहे, जिथे बसून दहशतवादी कोणत्याही भीतीशिवाय युरोपात दहशतवादी हल्ल्याचा कट रचू शकतात. पाकिस्तानात मानवाधिकारांचं खुलेआम उल्लंघन होत आहे आणि याचा उल्लेखही केला जात नाही.”
Fulvio Martusciello,Group of European People's Party (Christian Democrats), Italy: Pakistan has threatened to use nuclear arms. Pak is somewhere where terrorists have been able to plan bloody terrorist attacks in Europe without mentioning tremendous human rights violation in Pak pic.twitter.com/7jhYJSPGNj
— ANI (@ANI) September 18, 2019
युरोपियन संघाने काश्मीर प्रश्नाचे शांततेने निराकरण करण्याचा सल्ला दिला
या समस्येचं सामाधान शांततेच्या मार्गाने करता यावं यासाठी युरोपियन संघाच्या संसदेने भारत आणि पाकिस्तानला या मुद्द्यावर एकमेकांसोबत थेट बोलण्याचं सल्ला दिला आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचावर सतत या मुद्द्यावर बोलण्यासाठी तिसऱ्या मध्यस्थाची मागणी करत आहे. जगातील बहुतांश देश पाकिस्तानचं ऐकत नाहीत असं दिसत आहे. बहुतांश देश पाकला भारताशी थेट बोलण्याचा सल्ला देत आहेत.
Visit : bahujannama.com