बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान 6 कोटी ईपीएफओ खातेधारकांना आपल्या ईपीएफ(EPFO) खात्यातून पैसे काढण्याची परवानगी दिली होती. लॉकडाऊनच्या दरम्यान संपूर्ण देशात ईपीएफओच्या 52 लाख खातेधारकांनी पैसे काढण्यासाठी क्लेम केला होता. यामध्ये ईपीएफओने सर्वांचे पैसे वेळेवर दिले. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यानुसार, ईपीएफओने कोविड-19 च्या दरम्यान 52 लाख क्लेमसाठी 13,300 कोटी रुपयांचे वाटप केले.
असोकॅम फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, केंद्र सरकारने महामारीशी लढण्यासाठी लॉकडाऊनच्या दरम्यान 6 कोटी ईपीएफओ खातेधारकांना अंशत: पैसे काढण्याची सुविधा दिली होती. यामध्ये कुणीही ईपीएफओ खातेधारक आपल्या ईपीएफच्या 75 टक्केपर्यंत रक्कम काढू शकत होता. तर, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी म्हटले की, सरकारच्या या उपक्रमाद्वारे संपूर्ण देशात 52 लाख ईपीएफ खातेधारकांना लॉकडाऊनच्या दरम्यान चांगला दिलासा मिळाला.
रक्कम पुन्हा जमा करण्याची आवश्यकता नाही
केंद्र सरकारने कोरोना महामारीशी लढण्यासाठी अर्जंट नोटिफिकेशन जारी करून ईपीएफ खात्यातून विदड्रॉल करण्याची परवानगी दिली होती. या नोटिफिकेशनमध्ये सरकारने ईपीएफ खात्यातील 75 टक्केपर्यंत रक्कम विदड्रॉल करण्याची परवानगी दिली होती. जी खातेधारकांना परत करण्याची आवश्यकता नव्हती. ज्याचा देशभरातील सुमारे 52 ईपीएफ खातेधारकांनी फायदा घेतला.