नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कार्यक्षेत्रात कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना किमान ७,५०० रुपये मासिक निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसह पेन्शन संघर्ष समितीने रामलीला मैदानावर मोर्चा काढला. हजारो पेन्शनरांनी यात भाग घेतला. निवृत्तीवेतनधारक महागाई भत्त्यासह मासिक ७५०० रुपये निवृत्तीवेतन, पेंशनधारकाच्या जोडीदारास मोफत आरोग्य सुविधा आणि ईपीएस ९५ च्या अंतर्गत नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्यांना ५००० रुपये मासिक निवृत्तीवेतनाची मागणी करीत आहेत.
ईपीएस ९५ अंतर्गत कर्मचार्यांच्या मूलभूत पगाराच्या १२ टक्के भविष्य निर्वाह निधीचा असतो. त्याच वेळी, नियोक्ताच्या १२ टक्के वाटापैकी ८.३३ टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेला जातो.
या व्यतिरिक्त पेन्शन फंडामध्येही सरकारचे १. १६ टक्के योगदान आहे. निवृत्तीवेतनधारकांचे म्हणणे आहे की ३०-३० वर्षे काम करूनही आणि सतत ईपीएस आधारित पेन्शनला हातभार लावूनही कर्मचा्यांना मासिक पेन्शन म्हणून जास्तीत जास्त ५०० ते २५०० रुपये मिळतात. यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे जगणे कठिण आहे.