अशी आहे या दोघांची ओळख…
सचिन माळी यांच्यावर नक्षलवादी असल्याचा आरोप ठेऊन राज्य सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात टाकले होते, त्याकाळात त्यांची पत्नी शीतल हिने महाराष्ट्रभर शाहिरी आणि डफच्या मदतीने रान उठवले होते, गावकुसबाहेरच्या माणसाच्या वेदना आपल्या काव्याच्या माध्यमातून वेशीवर मांडणारे हे शाहिरी जोडपे अतिशय प्रभावी असून या दोघांच्या सत्यशोधक शाहिरीने विझल्या मनांना आग लावण्याचे काम सातत्याने होत असते. तर सचिन हा एक उत्तम कवी आणि लेखक असून आजवर त्याची 5 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, वंचितांच्या हक्कसाठी प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केलेल्या राजकीय लढ्याला यश मिळून त्यांच्या स्वप्नातील राज्य येईपर्यंत आपण वंचित बहुजन आघाडी सोबत राहू असा संकल्प करीत या जोडीने आज पक्षात प्रवेश घेतला, प्रकाश आंबेडकर आणि विजय मोरे यांनी सन्मान पत्र देत या दोघांचे पक्षात स्वागत केले.