‘अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – देशात२०१४ ला भाजपचे सरकार आले तेव्हापासून देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. मुस्लिम लोक भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. त्यात पाकिस्तान सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो काही शांत नाही सतत मोदींच्या खोड्या काढतोय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूका होतील कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून देशात कधीही आणीबाणी लागू होऊ शकते. असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी अहमदनगर येथील सत्ता संपादन मेळाव्यात केला आहे.
‘देशात२०१४ ला भाजपचे सरकार आले तेव्हापासून देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. मुस्लिम लोक भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. त्यात पाकिस्तान सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो काही शांत नाही सतत मोदींच्या खोड्या काढतोय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूका होतील कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून देशात कधीही आणीबाणी लागू होऊ शकते. असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी अहमदनगर येथील सत्ता संपादन मेळाव्यात केला आहे.
१९४८मध्ये ज्यावेळी भारत -पाक फाळणीची चर्चा सुरु होती तेव्हाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काश्मीर आपल्याकडे घ्या, नाहीतर त्यांना देऊन टाका,’ असे सुचवले होते. पण मागील ७० वर्षात हा प्रश्न सुटलेला नसून उलट भारतासाठी डोकेदुखीच बनला आहे .काश्मीरची आजची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे’, पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, ‘अडीच जिल्ह्यांच्या काश्मीरने जर आख्ख्या देशाचे राजकारण बदलणार असेल तर रोखठोक भूमिका घ्यायला हवी. देशात कोणाचीही सत्ता आली तरी पाकिस्तानशी दोन हात करावेच लागणार आहे. त्यामुळे काश्मीरमधील जनतेचे मत घेऊन त्यांना आपल्याकडे राहायचे कि पाकिस्तानला जायचे हे ठरवावे लागणार आहे. आम्हाला आमची माणसे वाया घालवण्यात स्वारस्य नाही’, असे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे,’ असेही आंबेडकर म्हणाले. पुलवामा ताफ्यातील बस कोणत्याही ब्लास्टपासून सुरक्षीत राहू शकणाऱ्या होत्या. फक्त एकच बस अशी सक्षम नव्हती व तिच्यावरच हल्ला झाल्याने ही बस सक्षम नसल्याचे अतिरेक्यांना कोणी सांगितले, याची चौकशी पंतप्रधान मोदी कधी करणार?
सर्जिकल स्ट्राईकचा काहीच परिणाम झालेला नाही. त्यांनी तो करण्यासाठी विरोधी पक्षांशी चर्चा करायला हवी होती प्रश्न सुटण्यास मदत झाली असती. पण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सध्याचे सरकार युद्धाचे मार्केटिंग करीत आहे व ही देशासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. युद्ध सुरू केले तर त्याच्या परिणामांची चिंता करण्याचे काहीच कारण नाही. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले पाहिजेत. पण पंतप्रधानांच्या सध्याच्या कारवाईला काहीच दिशा नाही. केवळ आपला इगो सांभाळण्यासाठी तसेच मी तुला धडा शिकवू शकतो, एवढेच सांगण्यासाठी त्यांची कारवाई सुरू आहे.