पुणे बहुजननामा ऑनलाईन – ईडी आणि आयबी हे दोन बलाढ्य कार्यकर्ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे आहेत. ते इतर पक्षातील पक्षातील नेत्यांनी तुम्ही कसं राहिलं पाहिजे, कोणत्या पक्षात गेलं पाहिजे, नाही गेले तर काय होईल या सर्व गोष्टींची कल्पना ते देतात. तसेच कोणता पक्ष सोईस्कर राहिल हेही सांगतात. भाजपमध्ये सुरु असलेली मेगा भरती ही या दोन बलाढ्य कार्यकर्त्यांमुळेच सुरु आहे. असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत किंवा ज्या नेत्यांना विविध आरोपांखाली चौकशीची भीती आहे. तेच भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, मुख्यमंत्र्यांनी पक्ष प्रवेशावर ठाम भूमिका घेत आरोप असलेल्यांची चौकशी पक्ष प्रवेशानंतरही निष्पक्षपणे केली जाईल अशी घोषणा केली. असे शेट्टी म्हणाले.
तर आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा काढली जात आहे. पीक वीमा योजनेत खासगी कंपन्यांकडून करण्यात येणारी नफेखोरी, धनगर आरक्षण, कांदा आणि ठिबकचे थकलेले अनुदान, बांधकाम कामगारांचे मृत्यू अशा अकरा प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांना द्यावी.अन्यथा आम्ही देखील मुख्यमंत्र्याच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.