नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतात अनेक कंपन्या ऑफिस टाइमनंतर मोफत ओवर टाइमच्या कल्चरला प्रोस्ताहन देतात. कंपन्या मात्र त्या बदल्यात कर्मचाऱ्यांना कोणताही परतावा देत नाही किंवा आधिक रक्कम देत नाही. परंतू केंद्र सरकार लवकरच एक नवा प्रस्ताव आणत आहे. जो लागू झाल्यास ओवरटाइन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुप्पट परतावा/ पगार देण्याचा मार्ग मोकळा होईल. याशिवाय कंपन्या कोणत्याही लेखी मंजूरीशिवाय कर्मचाऱ्याकडून ओवर टाइम करुन घेणार नाही.
कामगाराच्या लेखी परवानगी शिवाय ओवरटाइम नाही –
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी मागील आठवड्यात एक विधेयक सादर केले. ज्यात कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही लेखी परवानगीशिवाय ओवरटाइम न करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच ओवरटाइम करुन घेतल्यास दुप्पट पगार देण्यात प्रस्ताव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यात बेसिक पे, महागाई भत्ता आणि रिटेन्शन पे चा सहभाग आहे.
भारतातील कर्मचारी वेळे पेक्षा आधिक काम करतात –
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायजेशनने (NSO) २०१७ – २०१८ च्या एक पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वेक्षण केला होता. या सर्वेक्षणात NSO ला यात आढळले की आधिक कर्मचारी एका आठवड्यात ४८ तासांपेक्षा आधिक काम करतात. जे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या निर्धारित वेळेपेक्षा आधिक आहे. सर्वेक्षणानुसार कर्मचारी आठवड्यात ५३ ते ५६ तास काम करतात. तर स्वयंरोजगार करणारे लोक आठवड्यात ४६ ते ५४ तास आणि कॅजुअल वर्कर ४३ ते ४८ तास काम करतात.