बहुजननामा ऑनलाइन टीम – दाट धुक्यामुळे भरधाव कार कंटेनरमध्ये घूसून झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहे. मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात गुरुवारी (दि. 28) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास (horrific accident)हा अपघात झाला. अपघातातील मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत.
उत्तर प्रदेशातून संपूर्ण कुटुंब तवेरा गाडीने पुण्यात येत होते. त्यावेळी एबी रोडवर उडनखेडीजवळ गाडीला हा भीषण अपघात झाला. अपघातात चौघे जागीच ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना इंदूरच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान यापूर्वीही दाट धुक्यामुळे अनेक गाड्या एकमेकांवर धडकून भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे दाट धुक्यात वाहन चालवितांना चालकाने वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.