मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काल म्हणजेच सोमवारी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर अनेक नवीन चेहरे मंत्रिमंडळात समाविष्ट झाले आहेत. परंतु काही जणांना मंत्रिमंडळात पद भेटण्याची अपेक्षा होती. त्यांची मात्र नाराजी झाली आहे. अशातच विधानसभेत निवडून येणारे आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रीपद देण्यावरून महाविकास आघाडीमध्ये बरीच ओढाताण झाली होती. राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदाच सामील झालेले प्राजक्त तनपुरे आणि आदिती तटकरे यांना राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य हे पक्षसंघटनेवर काम करतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण यावर आता उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला आहे.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून आदित्य हेही त्यांच्यासोबत दिसत असून काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.
तेव्हा आदित्य हे आमदार असताना देखील कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्यांची उपस्थिती का, असा प्रश्न निर्माण झाला होता.आदित्य यांना कॅबिनेटचे मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्याही बैठकीला उपस्थिती लावणे शक्य होणार असून राज्याचा कारभारही चांगल्या पद्धतीने समजून घेता येणार आहे. त्यामुळेच आदित्य यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
Visit : bahujannama.com