नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात आंदोलन चालूच आहेत. याच दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस हे आम्ही धर्माच्या आधारे भेदभाव करत नसल्याचे बोलले आहेत. काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्यासोबत लग्न केल्यावर त्यांना इथले नागरिकत्व मिळाले. तेव्हा त्यांना त्यांच्या धर्माबद्दल कोणी विचारले का? हा कायदा स्वच्छ असतानाही त्याबद्दल वाद सुरु झाला आहे. या कायद्याच्या आंदोलनादरम्यान अनेक जणांचा मृत्यू झाला, असे राम माधव यांनी म्हणाले.
राम माधव पुढे म्हणाले की, नागरिकत्व मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. तसेच तीन देशांच्या लोकांना नागरिकत्व मिळेल. नागरिकत्व हा कोणताही कायदा नसून कोणत्याही मुसलमान नागरिकाला नागरिकत्व घेता येऊ शकते. त्यासाठी फक्त काही कायदे पाळणं आवश्यकी आहे. असेही माधव म्हणाले.
राम माधव यांनी १९७२ मधील युगांडामधील हुकूमशहा आदी अमीन याने राज्य करून सर्व लोकांना बाहेर काढल्याचे उदाहरण दिले. त्यातील अनेक गुजराती होते. काही जण लंडन मध्ये गेले तर काही भारतात आले. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना मदत केल्यावर कोणी काही बोलले नाही.सध्या बांग्लादेशात अल्पसंख्याकांसाठी चांगली स्थिती नाही. एनआरसी हा सीएए पेक्षा पूर्ण वेगळा आहे. देशात नागरिकत्व कायद्याबाबत निदर्शने करत असताना भाजपकडून या कायद्याचे समर्थन केले जात आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी #IndiaSupportCAA हा हॅशटॅग वापरत ‘भारत सीएएचे समर्थन करत आहे, कारण सीएए हा कायदा निर्वासितांना नागरिकत्व देण्याबाबत आहे. हा कायदा कोणाचही नागरिकत्व हिसकावून घेण्याबद्दल नाही. नमो ऍपवर सीएए संबंधित अनेक दस्तऐवज, विडिओ आहेत. तेव्हा त्याच्या समर्थनार्थ तुम्ही अभियान चालू करा’, असे म्हटले आहे.