लंडन : बहुजननामा- डॉ. बाबासाहेंबाना अभिप्रेत असलेली समाजरचना समता, स्वतंत्र, बंधुता, न्याय या मूल्यावर आधारित समाजाची पुनर्रचना अभिप्रेत होती. पण त्यांनी पाहिलेले स्वप्न अजूनही सत्यता उतरले नाही.पण त्यांच्या स्वप्नातील भारत घडविणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लंडन मधील भारतीय उच्चायुक्त कार्यालय इंडिया हाऊस येथे ७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले बोलत होते. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाची अमल बजावणी करून खऱ्या अर्थाने भारताला एकसंघ राष्ट्र बनवले.
भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ
संविधान असल्याची ओळख बनली आहे. भारत हा जातीविरहित प्रजासत्ताक राष्ट्र बनवण्याचे जे स्वप्न बाबासाहेबानी पाहिलेले होते. ते अधुरे आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्व भारतीयांनी ते कार्य केले पाहिजे. सबका साथ सबका विकास या तत्वातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकात्मतेचा विचार मजबूत करीत आहेत. संविधानातील भारत घडविण्यासाठी संविधानिक मूल्यांची जोपासना करण्याचा निर्धार करा असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.