नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 मध्ये हरिनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी शाहीन बागमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनावरून धक्कादायक वक्तव्य केले आहे. बग्गा यांनी म्हटले की, 11 फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल लागताच शाहीन बागमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले जाईल.
तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी अॅक्टिविस्ट तपन बोस यांचा व्हिडिओ ट्विट करून लिहिले आहे की, शाहीन बाग समर्थकांनी काल जंतर मंतरवरून म्हटले की भारतीय लष्कर आपल्याच लोकांना मारते, भारतीय लष्कराची तुलना पाकिस्तानी लष्कराशी केली जात आहे. शाहीन बाग देशद्रोहाचा अड्डा झाला आहे, 11 तारीखेला निकाल लागताच सर्वात आधी या अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राइक केले जाईल.
मागच्या गुरूवारी राजधानी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सीएए आणि एनआरसीविरूद्ध आंदोलन करण्यात आले होते, येथे अॅक्टिविस्ट तपन बोस यांनी म्हटले होते की, शेजारील देश आपला शत्रू नाही. शेजारील देशाशी शांततेने राहण्यासाठी जे प्रयत्न करतात ते देशभक्त आहेत. देशद्रोही नाही. यांच्या (मोदी सरकार) विरूद्ध काही म्हटले की, ते आम्हाला पाकिस्तानी म्हणतात. हे निरर्थक आहे. पाकिस्तान आपला शत्रू नाही. बोस यांनी म्हटले, येथील सरकारी वर्ग आणि तेथील सरकारी वर्ग एक सारखाच आहे. त्यांचे लष्कर आणि येथील लष्कर एकसारखेच आहे. त्यांचे लष्कर आपल्या लोकांना मारते, आणि आपले लष्कर आपल्याचा लोकांना मारते. दोन्हीमध्ये काहीही अंतर नाही. तुम्ही पाकिस्तानमध्ये जा आणि लोकांशी बोला, ते आपल्याशी खुप प्रेमाने बोलतात. प्रत्येक गोष्टीत ते म्हणतात सामंजस्य व्हावे. काही तरी करा तुम्ही.