नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या काळात आम आदमी पार्टी (आप) ५७ जागांवर आघाडीवर आहे, तर भारतीय जनता पक्ष १३ जागांवर आघाडीवर आहे. तिसऱ्यांदा दिल्लीत केजरीवाल सरकार स्थापन होताना दिसत आहे. आपल्या पार्टी कार्यालयात उत्सवाचे वातावरण आहे. मतमोजणी दरम्यान आपने आणखी एक मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम आहे राष्ट्र निर्माण. आम आदमी पार्टीच्या (आप) पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी नवीन पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टर वर लिहिले आहे की – राष्ट्र बांधणीसाठी आपमध्ये सामील व्हा,या मध्ये सामील होण्यासाठी या नंबरवर 9871010101 मिस कॉल द्या. ‘ असा विश्वास आहे की भाजपाच्या पावलावर पाऊल ठेवून आता आप एक मोठा मुद्दा निर्माण करणार असून त्यासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर मोठी मोहीम सुरू होईल.
आप देशभक्तीचे धडे देणार
आम आदमी पार्टीच्या (आप) जाहीरनाम्यातही याची झलक दिसून आली आहे. ‘आप’चा जाहीरनामा जारी करताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जाहीर केले की जर सरकार स्थापन झाले तर सरकारी शाळांमध्ये सुरू झालेल्या हॅपीन्स अभ्यासक्रम आणि उद्योजकता अभ्यासक्रमाच्या यशानंतर देशभक्ती अभ्यासक्रमही आणला जाईल.
आपने दहशतवादी म्हटल्याचा मुद्दा निर्माण केला
निवडणुकीच्या प्रचारात भाजपने वारंवार शाहिन बागेचा मुद्दा उपस्थित केला आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादीही म्हटले. मी दहशतवादी आहे की नाही हे दिल्लीतील लोकच ठरवतील हे केजरीवाल यांनी याचे उत्तर दिले. प्रत्येक जाहीर सभेत केजरीवाल यांनी अतिरेकी म्हटल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्या कृत्या मोजताना ते म्हणाले की तुमचा मुलगा दहशतवादी आहे की नाही याचा निर्णय तुम्ही घ्या.
जब से मैंने एक TV चैनल पे हनुमान चालीसा पढ़ा है, भाजपा वाले लगातार मेरा मज़ाक़ उड़ा रहे हैं। कल मैं हनुमान मंदिर गया।आज भाजपा नेता कह रहे हैं कि मेरे जाने से मंदिर अशुद्ध हो गया। ये कैसी राजनीति है? भगवान तो सभी के हैं। भगवान सभी को आशीर्वाद दें, भाजपा वालों को भी।
सबका भला हो
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 8, 2020
हनुमानावर शुद्ध-अशुद्धचे राजकारण
निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका कार्यक्रमादरम्यान हनुमान चालीसाचे पठण केले होते. यानंतर ते हनुमान मंदिरातही गेले. यावर मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांनी हनुमान मंदिर अपवित्र केल्याचा आरोप केला. भाजपच्या आरोपाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की हे कसले राजकारण आहे ? देव प्रत्येकाचा आहे.