नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले असून लवकरच त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना आमंत्रण दिले गेले असून अजून समाजसेवक अण्णा हजारे यांना आमंत्रण दिले गेलेले नाही.
पहिली कार्यकाळावेळी शपथविधी सोहळ्याला अण्णांना आमंत्रण दिले होते. त्यावेळी अण्णांनी आरोग्य मुद्द्यांना समोर ठेवत समारोहात सहभागी होण्याचे बोलले होते. सूत्रांनुसार केजरीवालांनी अण्णांना फोन करत यायला सांगितले असून त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.
अण्णांना तिसऱ्यांदा शपथविधी घेण्याबाबत विचारले असता कोणतेही आमंत्रण मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यास उशीर होत असल्यामुळे त्याविरोधात २० डिसेंबरपासून मौनव्रत धारण केला असून दोषींना फाशी दिल्यावरच ते त्यांचा व्रत सोडणार आहेत. जेव्हा त्यांना काहीतरी बोलायचे असते तेव्हा ते कागदावर आपली प्रतिक्रिया लिहून देतात, असे अण्णांच्या सचिवाने सांगितले आहे.
त्यांच्या सचिवाने जेव्हा अण्णांना केजरीवाल यांच्या विजयाबद्दल सांगितले, तेव्हा अण्णांनी ‘ठीक आहे’ एवढेच लिहिले. सचिवाने जेव्हा त्यांना मीडियाला त्यांची प्रतिक्रिया हवी असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नसल्याचे सांगितले. पण हजारे यांचे मूळचे गाव राळेगण सिद्धी येथील रहिवाश्यांनी मंगळवारी केजरीवाल यांच्या विजयाचा आनंद साजरा करत फटाकेही फोडले. तर अण्णांना आमंत्रण न दिल्यामुळे त्यावर चर्चा चालू झाली आहे.