नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसर्या लाटेने आपले केवळ आरोग्यच हिसकावले नसून शांती सुद्धा हिसकावली आहे. कोरोनाने शारीरीक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे नुकसान केले आहे. कोरोना काळात युपीमध्ये कौटुंबिक हिंसेचे प्रकार पाचपट वाढले आहेत. कौटुंबिक हिंसा विविध प्रकारची असते जसे की शारीरीक, मौखिक, भावनात्मक आणि आर्थिक. कौटुंबिक हिंसेत युपीमध्ये लखनऊ नंबर एकवर आहे तर वाराणसी पाचव्या क्रमांकावर आहे.
बीएचयू आयआयटीत कन्सल्टंट सायकोलॉजी अँड सायकोथेरेपिस्ट डॉक्टर लक्ष्मण यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत कुणाला अंदाज सुद्धा नव्हता की, हा शारीरीकसह मानसिकदृष्ट्या किती परिणाम करेल.
डॉक्टर लक्ष्मण म्हणतात की, मानसिक समस्या डिप्रेशन, एंग्जायटी, ओसीडी, झोपेची समस्या आणि पॅनिक अटॅकच्या रूपात दिसत आहे. कोरोना काळात लोकांमध्ये डिप्रेशन 40 टक्के, एंग्जायटी 30 ते 35 आणि ओसीडी 20 ते 25% वाढले आहे. याशिवाय युपीमध्ये कौटुंबिक हिसेच्या घटना पाचपट वाढल्या आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता पोलिसांनी पथकांची स्थापना केली आहे.
लॉकडाऊन दरम्यान अनेक लोकांच्या नोकर्या गेल्या आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. असंख्य लोकांना कोरोना झाल्याने लोक घाबरलेले आहेत. याचाच परिणाम म्हणून डोमेस्टिक व्हॉयलन्स वाढला आहे.
डॉ. लक्ष्मण यांच्यानुसार जवळपास 1000 लोकांचा डेटा उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या शहरातून जमा करण्यात आला आणि यामध्ये पाहण्यात आले की, कोणकोणत्या शहरात सर्वात जास्त डोमेस्टिक व्हॉयलन्सच्या जास्त केस दिसून आल्या. लखनऊमध्ये सर्वात जास्त 120 केस आल्या.