नवी दिल्ली: वृत्तसंस्था – सरकारने विज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि औद्योगिक विभागाने स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या समितीने देशातील कोरोनाची दुसरी लाट जुलै पर्यंत थांबेल. त्याचबरोबर तिसरी लाट जवळपास सहा ते आठ महिन्यांनी येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, समितीने केंद्र सरकारला सावध राहण्यास सांगितले आहेत. मे अखेर आणि जूनच्या सुरुवातीला रोज दीड लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळणार असून जुलै अखेर ही लाट संपण्याची शक्यता आहे.
देशातील १३ राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरयाणा, दिल्ली आणि गोवा राज्याचा समावेश आहे.२९ ते ३१ मे या कालावधीत तामिळनाडूत कोरोना डोके वर काढू शकतो. देशातील पूर्व ईशान्येकडील राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नाहीच्या बरोबरीने असून आसाम, मेघालया, त्रिपुरा मध्ये मे अखेर संसर्ग वाढू शकतो असे समितीचे सदस्य आणि आयआयटीचे (कानपूर) प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी म्हंटले आहे.
वैज्ञानिक काय म्हणतात?
सहा ते आठ महिन्यांनंतर कोरोनाची तिसरी येण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. या लाटेचा प्रभाव कमी करायचा असेल तर लसीकरणाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. कमीत कमी ऑक्टोबर २०२१ पर्यंत तिसरी लाट येणार नाही.
भारताला ६० दशलक्ष लस मात्रा द्या: जॅकसन
अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाने भारताला अँस्ट्राझेनेका लसीच्या ६० दशलक्ष मात्रा द्याव्यात, असे अमेरिकेतील नागरी हक्क नेते रेव्ह जेस्सी जॅकसन यांनी म्हंटले असून संपूर्ण जग भारतासाठी प्रार्थना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.