बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अजून कडक पाऊले उचलली आहेत. रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होताना दिसत आहे . त्यामुळेच ३१ मे पासून रोज तब्बल १ लाख लोकांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच अजूनही परिस्तिथी नियंत्रणात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
We will be able to produce RT-PCR and antibody test kits in India by May. All processes are in advanced stage and production will start after getting approval from ICMR. It will help us in meeting our target of 1 lakh test per day by May 31: Union Health Minister Dr Harsh Vardhan pic.twitter.com/sSK1zASVsB
— ANI (@ANI) April 28, 2020
भारतात कोरोनाबाधितांची संख्या २९ हजारांवर गेली आहे. . तसेच मृत्यूचा आकडा हा ९०० च्या वर गेला आहे. . त्यामुळेच कोरोना टेस्टिंग वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. टेस्ट करण्यासाठीच्या ५ लाख किट्स सरकारने चीनमधून आयात केल्या होत्या. मात्र त्या अतिशय हलक्या आणि निकृष्ट दर्जाच्या असल्याने सरकारने हा काँट्रॅक्टच रद्द केला आहे. अशा प्रकारच्या किट्स देशातच तयार होण्याचं काम देशपातळीवर चालू आहे. त्यासाठी आयसीएमआर ची मान्यता हवी असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.
३१ मे पूर्वी देशात पुरेशा किट्स तयार होतील आणि ३१ मेपासून दररोज १ लाख टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या लवकरात लवकर कळण्यास मदत होईल.